पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!
सलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
सलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!
मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम..
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम..
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम..
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम..
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्या सुरक्षा यंत्रणेला सलाम..
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम..
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम..
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम..
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्या लास्ट बुलेटला सलाम..
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम..
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम..
मुंबईवर हल्ला करणार्या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्या आपल्या नेत्यांना सलाम
ते आम्ही नव्हेच म्हणणार्या त्यांच्या नेत्यांना सलाम..
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम..
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्याला सलाम..
कोरडे अश्रू ढाळणार्या लोकांना सलाम…
शाहीदांच्या बॅनर लावणार्या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्यांना सलाम…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना सलाम..
त्यांचे फोटो प्रदर्शित करणार्याला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्याला सलाम…
कसाबला जिवंत पकडणार्या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्या मानवाधिकार समितीला सलाम..
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
राग येऊन काही न करणार्यांना ह्या आपल्या हिजडयांच्या मानसिकतेला सलाम…
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..
सलाम तुम्हा सर्वांना सलाम…
सलाम तुम्हा सर्वांना सलाम…
———
आताच दिवाबत्ती करून, टीवीवर न्यूज़ हेडलाइन्स बघितल्या..एवढे महिने ज्याच्या बद्दल कोणी चकार शब्द न काढणारे मीडीया हेडलाइन्स याच्या नावाने भरभरून बातम्या देत आहेत..काय म्हणता? कोणाबद्दल बोलतोय मी..आठवा की २६/११. आठवलं नं? अजमल कसाब? मागे लिहलं होत ह्यावर, लिहावसं वाटत पण नाही..पण 😦 कसाब आहे अजुन तो भारताच्या आदरातिथ्याचा उपभोग घेत..मस्त बिर्यानी ओपत..मराठी शिकत..न्यायालयात नाटक करत हा भडवा अजुन जिवंत आहे (सॉरी, जर ह्याला शिवी नाही देता आली तर मी याचा उल्लेख ग्रेट कसाब करेन पण ते चालेल का तुम्हाला?…खरच ग्रेट माणूस आहे हा, एवढा क्रूर कृत्य करून हा जिवंत आहे वर ग्रेट टूअर ऑफ इंडिया करतोय ते पण आपल्याच पैशाने..मग तो ग्रेट नाही का?)
दीड वर्ष झालं, उद्या (३ मे) म्हणे ह्याला शिक्षा सुनावणार आहे…दीड वर्ष ह्या केसचा निकाल द्यायला, ते पण असा फास्ट ट्रॅक कोर्ट जे फक्त त्या २६/११ च्या खटल्यासाठी नेमलेलं…तरी दीड वर्ष..५० हजाराच आरोपपत्र..एक सरकारी वकील आणि २-३-४ त्याचे वकील… मग निकाल लागेपर्यंत, याला स्पेशल सेल मध्ये ठेवलं, रोज खाऊ, पियू घातलं, आठवड्यातून मेडिकल टेस्ट, पोलीस बंदोबस्त, सगळे पुरावे परत परत सदर करणे कोर्टात, त्या दहशतवादीचे मुडदे जपून ठेवणे, वकिलांची सुरक्षा, ह्यूमन राइट्सची धडपड, आणि मीडीयाचा एअर टीरपी. हे भारताच्या न्याय व्यवस्थेचे काढलेले धिंडवडे आहेत जगभर हे कस नाही कळत ह्याना? कसली छाती ठोकून सांगता आम्ही दोषीवर कारवाई केली अरे थूssss तुमच्या या कारवाईवर..
शहिद झालेल्या लोकांची किती हाय लागेल ह्या न्यायदेवतेला आणि ह्या शंढ सरकारला ते माहीत नाही ह्याना. मला खात्री आहे उद्या त्याला फाशी होईल..होईल ना? की जन्मठेप? की परत अपील करणार हा? [ही कसली खात्री :(]
पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला माहीत आहे ना ह्याला जिवंत पकडून काही माहिती मिळाली नाही..द्यायचा की उडवून का जिवंत पकडून आपली नाचक्की करून घेतलीत? त्या २६/११ ते २८/११ पर्यंत मुंबईला ह्यानी हाइजॅक केल होत..विसरलात? प्रत्येक मुंबईवासी त्या दडपणाखाली, भीतीखाली होता माहीत आहे ना? उद्या जरी त्याला फाशी झाली तरी तो अल्लाचे आभारच मानेल, दीड वर्ष जिवंत राहिला ते पण राजा सारखा…
खरच हा कसाब जगाला आणि आपण??…काळजी नसावी कधीतरी मरु की आपण एखाद्या हल्ल्यात..व्हा तयार. मी रोजच असतो, तुम्हीपण व्हा….