शुक्रवार २० ऑगस्ट, आमच्या प्रोसेसला भारतात तीन वर्ष पूर्ण झाली. संपूर्ण फ्लोरवर फुगे, लाइट्स लावले होते. मोठा केक आणला होता, फोटो काढत होते. कोणीच कामात लक्ष देत नव्हते. काम खूप वाढल होत हल्ली, पण त्यादिवशी कोणाला कशाचीच फिकर नव्हती. मी आपला माझ्या पॉडवर बसून काही एस्कलेशन्स बघत होतो. राहून राहून एक ईमेल मी सारखा बघत होतो. थोडे बदल करून परत ड्राफ्टमध्ये टाकून द्यायचो. हा ईमेल मी तयार केला होता तब्बल ३ वर्षापूर्वी, जेव्हा मी अडोबीला नवीन नवीन जॉइन झालो होतो. हा ईमेल होता राजीनाम्याचा.
अडोबी जेव्हा आधी जॉइन केल, तेव्हा ट्रेनिंग पार्ट सोडला की मग लगेच नाइट शिफ्ट सुरू होणार होती. खूप उत्सुक होतो एक वेगळ विश्व अनुभवायला मिळणार म्हणून. पहिले एक-दोन आठवडे जांभया देत, चहा पीत रात्र जागवल्या. त्याचे परिणाम दिसून आलेच अचानक तब्येत खराब झाली, ऑफीसला दांडी मारू शकत नव्हतो किंबहुना पहिलीच नोकरी असल्याने तस करायची भीती वाटायची. काही दिवस खुपच त्रास झाला, पण मग सावरलो आणि तेव्हा पासून जो आलो तो गेल्या महिन्यापर्यंत अविरत रात्रपाळी करणारा मी. त्यावेळी टायर केलेला तो ईमेल ड्राफ्ट मध्ये तसाच पडून होता. शॉन सकाळची शिफ्ट दिली गेल्यावर थोडा भांभावला, थोडा सांभाळून घेताना त्रास झाला, स्कोर्स पडले. मग कधीही मला माझ्या स्कोर, कामाबद्दल बदद्ल न विचारणारे माझ्यावर सरेखे नजर ठेवून असायचे. मान्य होत माझा स्कोर पडला होता, पण मी तो मॅनेज पण केला होता पुढल्या आठवड्यात.
तीन आठवडे झाले नसतील, तर मला परत नाइट शिफ्ट दिली गेली एका आठवड्यासाठी, मग परत सकाळची शिफ्ट दोन आठवडे, मग परत नाइटशिफ्ट रमजानमुळे शादाबसाठी. स्कोर्सचे असे लागले की काय सांगू, आणि लॉगिन्सपण कमी असल्याने तुफान काम वाढलय. खूप खूप त्रास होत होता, वाटलं आधी पण अस झाल होत, तेंव्हा निभावून नेल आता पण जाईल, पण नाही कामाचा ताण एवढा वाढला की काय सांगू. स्व:ताची समजूत काढत होतो, सगळ ठीक होईल. मग स्कोर नाही आला की थांबायचो ऑफीसमध्ये, ब्रेक न घेता काम करायला लागलो, सगळे वेड्यात काढायला लागले. ह्याला काय झालं म्हणून, माझ्या मित्रांच्या ग्रूपमध्ये मी संशोधनाचा विषय होऊन बसलो होतो का हा वागतो असा, काय कारण असाव. काय उत्तर देणार कोणाला. 😦
परवा, तो ईमेल बघितला, माझ्या नवीन मॅनेजरच नाव टाकलं, तारीख टाकली आणि शेवटची नजर फिरवून वेळ ठरवून बंद केला. ऑफीसमध्ये सेलेब्रेशन चालूच होत, पीझ्झा, सब-वे सॅन्डविचेस, कोल्ड ड्रिंक्स. मी आपली शिफ्ट संपवली आणि निघलो खाली जायला. ऑफीसच्या मागच्या लिफ्टने. ट्रान्सपोर्टमध्ये बसलो, गाडी सुरू झाली बोरीवलीला पोचल्यावर, मी नकळतपणे त्याला गाडी बाजूला सिग्नलला लाव अस सांगितल, तिथून माझ घर ३-३.५ किलोमीटर होत, पण मी तिथेच उतरलो.
घरच्या दिशेने चालू लागलो, रस्ता निर्जन होता. माझ्या बुटांचाच आवाज मला ऐकू येत होता. काय माहीत मी काय करत होतो, तब्येत ठीक नसताना पावसात का चालत जात होतो, माझ्या शरीराला का त्रास देत होतो, मला काय तपासून पाहायचे होते, ते मला पण कळत नव्हते. पण अर्धवट भिजत चारकोपच्या सिग्नलला पोचलो. नाक्यावर पोलीस होते, त्यांनी विचारले काय रे कुठून आलास एवढ्या रात्रीचा? मग मी माझ आय कार्ड दाखवलं. मग तसाच पुढे निघालो. वातावरण खूप शांत होत, पण माझ्या मनातील आणि डोक्यातील विचारांचा गोंधळ एवढा वाढला होता की काय सांगू..
पाउस थोडा वाढला, मी ओवरकोट घातला आणि जरा लगबग करून चालू लागलो, पण विचारसत्र काही थांबत नव्हत्. तेवढ्यात झाडाखाली उभ्या असलेल्या साइकलवर कॉफी विकणार्या अण्णाने आवाज दिला, साहब टाइम क्या हुआ? माझ्याकडे ना घड्याळ होत, ना मोबाइल मी अंदाजे सांगितला ४ बज गये, त्यावर तो लगेच आवरायला लागला म्हणाला अपना टाइम तो खतम यहा से, अब दुसरी जगह जाना पडेगा, यहां और धंदा नही मिलेगा. आपको कुछ दु सिगरेट, कॉफी, बूस्ट? गुपचुप एक दहाची नॉट काढून त्याच्याकडून बूस्ट घेतलं आणि घराकडे निघालो.
मनात म्हटलं काही निर्णय घेण एवढचं सोप्प असत तर? 😦 😦
– सुझे
काय प्रतिक्रिया देवू?
बघ तुझ मन काय म्हणत ते अन ऐक
🙂
हो सागरा, काळजी नसावी..भेटूच लवकर पुण्यात
सुहासा, खरंच.. सागर म्हणतोय तसं काय प्रतिक्रिया द्यायची हे कळत नाहीये.. जो निर्णय घेशील त्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा.. आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोतच.. काहीही मदत लागली तर कळव.. हे खरं तर सांगायचीही गरज नाही पण तरीही..
नक्की हेरंब, काळजीचे कारण नाही रे..थॅंक्स नाही म्हणणार रे बाबा 🙂
अरे पठ्या मस्त पोस्ट… खरच आपण प्रचंड विचारात असताना एक साधासा प्रसंग आपल्याला बरेच काही शिकवून जातो… अरे काळजी करण्याचे काहीच करण नाही… काही दिवस आराम कर आता… काळजी करू नकोस… आराम कर..
मी आलो की भेटू आपण.. 🙂 तो आहे ना.. तो बघतोय… ‘चिंता करितो विश्वाची…’
अगदी मान्य हा प्रसंग साधाच 🙂
आरामच तर करतोय, आता पुणे दौरा उरकून घेतो…मग आपण भेटूच मुंबईत खादाडी करायला 🙂
आणि हो
“तो आणि मी मिळून शक्य नाही असा या जगात काहीच नाही” 🙂
अरे बापरे…हे काय सुहास राव…जास्त टेन्शन नको रे घेउस..तब्येतीची काळजी..होइल सगळ व्यवस्थीत..आम्ही आहोतच तुझ्याबरोबर…
अरे हो माहीत आहे देवेन आल ईज व्हेल 🙂
>>> अरे पठ्या मस्त पोस्ट… खरच आपण प्रचंड विचारात असताना एक साधासा प्रसंग आपल्याला बरेच काही शिकवून जातो… अरे काळजी करण्याचे काहीच करण नाही… काही दिवस आराम कर आता… काळजी करू नकोस… आराम कर..
मी आलो की भेटू आपण.. 🙂 तो आहे ना.. तो बघतोय… ‘चिंता करितो विश्वाची’.. +१
आणि हेरंबप्रमाणेच अरे आपण सगळे आहोत ना सोबत… एकमेकांच्या मदतीला… कुठलीही काळजी नको समजले का??
रोहनच्या कमेंटमधलं >>>> मी आलो की भेटू आपण.. 🙂 तेव्हढे फक्त “मी आले की म्हणायचे होते बघ 🙂 “.. बाकि भावना तश्याच.. 🙂
😛 tanvi… 😀
रोहणा काय रे 😀
हो ग तन्वीताई..भावना पोचल्या
काळजी कुठे करतोय मी, मी शांत आहे आणि सुट्टी एन्जॉय करतोय 🙂
सुहासा,
तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही तुझ्याबरोबर आहोत..
ऑल द बेस्ट!
येस्स विभि..
आभार प्रदर्शन नाही मांडत इथे घाबरू नकोस 😉
सुहास दादा, तू जो काही निर्णय घेशील त्या साठी माझ्या कडून शुभेच्छा… 🙂
Dont Worry…Be Happy….We all are with you…Always… 🙂
थॅंक्स मैथिली..God Bless you 🙂
Hmmmmmmmmm….. निर्णय…….मी हि असाच विचार करत होतो बरेच दिवस resign च्या अगोदर ….तुला पण माहित आहे….. then decided……अरे, कल करे जो आज , आज करे सो अभी !!!!!
Don’t worry & say …….ALL IS WELL..:)
येस्स मित्रा ते कसा विसरेन 🙂