मुंबईकरांचा पुणेरी दौरा…

आधीच सांगतोय मला मुंबईकर आणि पुणेकर असा काही वाद घालायचा नाही, त्यामुळे उग्गाच असा गैरसमज करून घेऊ नये पोस्टच्या शीर्षकावरून. ते शीर्षक फक्त एकाच कारणामुळे, मुंबईकरांची मेजॉरिटी होती ह्या छोटेखानी भेटीला.

पेठे काका यानी मागील वर्षी आयोजित पुणे बलॉगर्स मेळाव्याला इच्छा असून पण मला हजर नाही राहता आला याची खंत खूप दिवसापासून होतीच.  त्यांना मुंबई बलॉगर मेळाव्यालापण नाही येता आल, काही घरगुती कारणास्तव त्यामुळे आमची ही भेट पण हुकली. याच वर्षी जून दरम्यान अनुजाताई आणि तन्वीताई भारत भेटीस येणार असा कळल होत. तन्वीताई नाशिकला गेली होती घरी, कारण ईशानच्या मुंजीचा कार्यक्रम होता आणि अनुजाताई पुण्यात होती. मग पेठेकाका आणि अनुजाताईने सूत्र हलवली आणि २० जूनला पुण्यात भेटायाच असा ठरल. मला आणि सगळ्यांना तस कळवल गेल. मी लगेच होकार दिला कारण शनिवार आणि रविवार सुट्टीचाच म्हटला मी येतोय काही झाला तरी.

इथेच माझी गोची झाली का काय विचारताय? १९ जून हा माझा वाढदिवस..हॅपी वाला (ही गोची नाही बर:)) पण ह्या वर्षी शनिवारी आल्याने मला  मुद्दाम सुट्टी मागायला लागणार नव्हती आणि ऑफीसचे फटके चुकणार होते. त्यामुळे मी खुश होतो. पण हा कार्यक्रम ठरल्यावर मला जाणवला २० जूनला सकाळी निघालो की उशीरच होणार म्हणून आदल्यादिवशी निघाव लागणार आणि बाकी सगळे पण तयार होते. माझी गोची घरून परवानगी काढणे हीच होती, कारण मला त्यानी नाही म्हणून सांगितला नसत पण… असो. मग त्याच आठवड्यात तब्येत ठीक नसल्याने मी दोन दिवस सुट्टीपण टाकली होती. गुरुवार ते रविवार मोठा विकांत होता, त्यामुळे आईला सांगून वाढदिवस साजरा करायाच बेत शुक्रवारीच केला आणि फक्कड जेवण केला आईने पण पुरणपोळी शनिवारीच होणार असा आदेश तिने दिल्यावर माझी थोडी नाराजी झाली 😦 शेवटी, शनिवार दुपारपर्यंत सगळी धावपळ करत गरम गरम पुरण (फक्त पुरण, पोळी नाही) खाउन. आमचा तिकीट काढल बोरीवलीला, मग देवेन आणि मी बसमध्ये बसलो, ट्रॅफिक आणि इतर पिकउपमुळे बसला उशीर झाला होता. आकाचा दीड तास पुतळा झाला होता वाट बघून वाशीला 😉

बसवाल्याला घाई नव्हतीच हे एव्हाना आम्हा तिघांनाही कळून चुकल होत, त्यामुळे डुलक्या घेत, वैतागात बसमध्ये बसून होतो, बस खूपच उशिरा वाकडला पोचली आणि थोडी चुकामूक होत सगळे वाकडफाट्याला भेटलो. मी आणि देवेनने पहिल्यांदा कर्वेनगरला जायच ठरवल आणि पेठेकाका, ताईची भेट घेऊन मागे फिरायाच ठरवला सचिनच्या घरी जेवायला आणि आम्हाला नेण्याची-आणण्याची जबाबदारी सागरवर पडली. आम्ही तिघेही शहरात टिबल सीट बाइकवर फिरत होतो (स्वदेस सारखा डिक्टो..), कर्वेनगर खूपच लांब होत. आम्ही रस्ता शोधत शोधत फिरत होतो. शेवटी आम्हाला नक्की पत्ता मिळाला आणि आम्ही शेवटच्या सिग्नलला आलो आणि तिथेच आम्हा तिघांच्या कर्माने पोलिसांनी अडवल, बाइकची चाबी काढून घेऊन दंड भरायला सांगितला १२०० रुपये (यात लाइसेन्स, नंबरप्लेट आणि टिबल सीट हे सगळा बंडल्ड पॅकेज होता) चुक तर होतीच पण काय कराव, मग विनवणी करून (मांडवली करून) २५० रुपये देऊन निघालो. बघतो तर ज्या हॉटेलमध्ये जायच होत ते उजवीकडे होत आणि आम्ही सरळ गेलो आणि पकडले गेलो…:( असो. अनुजाताई, पेठेकाका आणि गौरी तिथे वाट बघतच होते. मस्त पावभाजी खाउन रविवारचा प्लान ठरवला आणि शनिवारवाड्याला भेटायाच असा ठरल. पेठेकाका जाम उत्साही होते, सगळी नोंद त्यानी तिथल्या टिशू पेपरवर लिहून सगळयांचे अड्डे (पुण्यातले) टिपून घेतले.

पुणेरी पाटी 🙂

मग आमच्या हट्टामुळे आम्ही परत पिंपळे गुरव ह्या सचिनच्या घरी जायचा निर्णय घेतला. आधीच पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेलो असल्याने प्रत्येक चौकात, प्रत्येक सिग्नलला आमची नजर फक्त पोलिसाना शोधत होती. नेमक त्याच दिवशी पोलिसांच पेट्रोलिंग पण सुरू होत रस्त्यावर. आम्ही बापडे प्रत्येक सिग्नलला उतरून सिग्नल एकानेच गाडीवरुन आणि दोघांनी पायी असे पार केले. अशी दहशत होती पोलिसांची की, रंगवलेली झाडेपण पोलीस समजू लागलो. सागरने, खूप धावपळ केली त्या रात्री, रस्ते शोधले, पूर्ण पुणे फिरवल. शेवटी कसेबसे पोचलो सचिनकडे रात्री २ ला. खूप भूक लागली होती पण रात्री १० लाच पुण्यातील सगळी दुकान, हॉटेल्स बंद झाली होती (ह्या वेळी मला माझे मुंबईतले अड्डे आठवू लागले. मुंबईत तुम्हाला कधीही हव तेव्हा सगळा खायला मिळत…जियो मुंबई) त्यामुळे भुकेमुळे आणि जागरणाच्या सवयीमुळे मला जास्त झोप लागलीच नाही. मस्त टेरेसवर जाउन मी फेर्‍या घालत होतो. सकाळी सगळे आवरून आधी नाश्ता करायची ही मागणी आका आणि मी उचलून धरली आणि तोवर पोटाला आधार म्हणून बिस्किट खाल्ले. पिंपळे गुरव येथून एसटी पकडून शनिवारवाड्याला पोचलो आणि उतरल्या बरोबर समोरच्या हाटेलात हल्लाबोल केला. पोहे, उपिठ, इडली आणि चहा घेतला. मग पेठेकाका ज्या स्टॉपला उभे होते तिथे पोचलो. सगळे जमे पर्यंत थोडा उशीरच झाला होता त्यामुळे आम्ही पुढची बस येईपर्यंत शनिवारवाडा बघितला. तिथे अपेक्षेप्रमाणे खूप बाजीराव आणि मस्तानी देखील होते. आम्ही दहा मिनिटात बाहेर आलो आणि शेंह्गडला जाणारी बस पकडली (शेंह्गड = सिंहगड. स्थानिक लोकांचा उच्चार) बस मधल्या धक्के देत रंगलेल्या गप्पा मस्त रंगल्या होत्या..बस मधून उतरून तन्वीताईची वाट बघत आम्ही एका फार्म हाउस वर थांबलो. तन्वीताई आली पूर्ण कुटुंबासकट मग तिथे आवरा फेम अभिजीत वैद्यपण आला.. मग आकाच्या सांगण्यानुसार थोड्यावेळाने फार्महाउसचा बेत रद्द करून सगळे गडाच्या दिशेने निघालो.

आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या जीपने वर जायच ठरवला. एका जीपमध्ये कमीतकमी १६ लोक गडावर आणावे असा हुकुम साक्षात श्रींनी दिल्यागत सगळी दादागिरी तिथे चालली होती, पण पर्याय नव्हता आणि आम्हाला मुंबईला परत फिरायाच होत लवकर म्हणून तो पर्याय सोडू शकत नव्हतो. मी आजवर सिंहगड कधीच बघितला नव्हता आणि बघायची तशी इच्छापण झाली नाही कारण तो गड एक प्रेक्षणीय स्थळ बनल आहे पुण्यातल. आज बघायची वेळ चालून आली पण किल्ला बघणारा, अनुभवणारा मी निराश झालो होतो. गडावर जायच्या रस्त्याला मरणाच ट्रॅफिक, कोणी कुठेही रस्त्यात गाडी पार्क करतोय, फोटो काढतोय, चाळे करतोय हे बघून अस्वस्थ झालो. हजारो लोक (दुकली-दुकलीच्या जोड्या जास्त..), निरनिराळे स्टॉल्स, भरपूर गाड्या, बीयरच्या बाटल्या बघून खूप उदास झालो. सरकारी सिमेंटची पायवाट खूप टोचात होती पायाला, त्यामुळे मी गडावर नाही तर बागेत किवा पिकनिक स्पॉटला फिरतोय असा राहून राहून वाटत होत 😦 हे एवढा सोडला तर बाकी कंपनी मस्तच होती. सगळे मस्त आनंदी, फोटो काढून ह्या आठवणी कॅमरामध्ये क्लिकसरशी बंद करून घेत होते.

गडावर मस्त भजी, ताक, केक, उकडलेल्या शेंगा, कैरी आणि वाफळलेला चहा घेत आम्ही परतीचा मार्ग धरला. सिंहगड हळू हळू धूक्यात हरवत जात होता जसजसे आम्ही खाली उतरायला लागलो. चालत, मस्त ओरडत, गाणी म्हणत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. आम्हाला मुंबईकडे निघायच होत (देवेन किती लांब राहतो ना रे विभि :..)

मग अनुजाताई, तन्वीताई, पेठेकाका, अमित, ईशान, गौरी ह्यांचा निरोप घेत आम्ही मुंबईच्या वाटेला प्रवास सुरू केला..सगळ्यांमधील अंतर रस्ते, शहरे यानी दूर होत होता पण मनाने सगळे खुपच जवळ आले होते. सचिन आणि सागरला खूप धावपळ करावी लागली आमच्यामुळे पण त्यानी हसत हसत सगळी मदत केली थॅंक्स दोस्तांनो. तन्वीताई तर सारख्या प्रवासाच्या दगदगीतून वेळ काढून आम्हाला भेटायला आली आणि आम्हाला तिची भेट सहजच खूपच सुखावून गेली. अनुजाताई आणि पेठेकाका तुमच्या उत्साहाला तोड नाही आणि आका तुझ्या फोटोग्राफीच्या कौशल्याला सलाम खूप छान फोटो काढले आहेस 🙂

चला, त्याच गोड आठवणी आठवत ही पोस्ट इथेच संपवतो.

फोटोस मी  >   इथे < अपलोड केले आहेत

— सुझे

कहानी घर घर की…

चला एका सुखी घरात डोकावूया…

एक प्रशस्त घर एकदम राजवाडा शोभावा अस..अंगणात ५-६ महागड्या गाड्या, एक मोठ्ठ तुळशी वृंदावन मग मागे बॅकग्राउंड स्कोर चालू होतो..एक सुंदर दिसणारी अभिनेत्री किलोभर दागिने घालून दरवाजा उघडते आणि आपल्याला त्या घरातली लोकांची ओळख करून देते..कमीत कमी २०-२२ लोक असतील नाही..अरे जास्त असो. ती लोक एवढी जास्त का आहेत त्याच कारण पुढे कळेलच. तर मग कुठे होतो हा ओळख परेड. घरातील सदस्यांचा एक फ्लो चार्ट काढला तर सगळ्यात वर एक प्रेमळ आजी-आजोबा. मग त्यांची ३ मुल आणि २ मुली, मग त्यांच्या बायका आणि नवरे, मग त्यांची पोर २-३, मग त्या पोरांमधील एकाच लग्न झालेला आणि एक लग्नाळू. मग घरात एक भरवश्याचा नोकर..हुश्श लक्षात ठेवा कोणाचे काय होते ते. (आजी-आजोबा कमीत कमी १२० वर्षाचे तरी असावेत..हा फक्त अंदाज आहे)

चला मग पुढे, हे घर शहरातील नावाजलेला बिजनेस टायकुन अमाप पैसा. अतिशय गुण्या-गोविंदाने नांदत असतात. एवढी गोड नाती संबंध एवढे गोड असतात की डायबेटिस व्हायचा (निदान मला तरी) तर ह्या घरच्या बरोबर उलट परिस्थिती असते एका कुटुंबात घर बेताचच..अतिशय संस्कारी, आई-बाबांचा आदेश म्हणजे काळ्या दगडाची रेघ..त्या घरातील मुलीच श्रीमंताच्या घरातील मुलावर प्रेम बसत आणि मोठ्या घरतल्या एका मुलीच त्या गरीब घरातील मुलावर प्रेम बसत..मग थोडे नकार-ना-ना करत मग ते लग्नाला तयार होतात..काही दिवस सगळा ठीक चालत. मग श्रीमंताच्या घरात भांडण होता दोन भावांमध्ये (कारण मरु द्या हो…कितीही समजूतदार असले तरी तोडायला छोटी कारण पूरतात) मग घराची वाटणी, बिजनेसचे वाटे, मग वेगळा राहणा, मग त्यांची हालअपेष्टा, अड्जेस्टमेंट (सॅड बॅकग्राउंड स्कोर सकट..लक्षात ठेवा बॅकग्राउंड स्कोर शिवाय एकही दृष्य चित्रित केला जात नाही.)..मग आता ते वेगळे झाले, पण मग मुलांमुळे ते परत एकत्र येतात मग त्याच जोरदार सेलेब्रेशन..हम साथ साथ है वळा एमोशनल सीन, गाणी..मग अचानक कोणी विलन येतो(हे पात्र असल्याशिवाय मज्जा कशी येईल), सांगतो की आजोबांच्या मुलाचा म्हणजे हल्लीच लग्न झालेल्या मुलांचे सासरे यांच बाहेर काही लफड होत कॉलेजच्या दिवसात आणि तो त्यांचा मुलगा आहे आणि मला माझा वाटा द्या अशी मागणी करतो (अरे देवा…असा मी नाही घरातले लोक म्हणतात). मग परत सॅडी सॅडी वातावरण, आजोबांच्या मुलाला हार्ट अटॅक, मग धावपळ, एक एकाच्या चेहर्यावर शॉकिंग असा भाव, एक अँगल वरुन, बाजूने, डाव्या बाजूने उजव्या बाजूने, वरुन, खालून, ब्लॅक न व्हाईट (आरर्र्र किती ते रिपीटेशन एकाच सीनचा..). मग देवाच्या प्रार्थना, देव प्रसन्न होतो, बाबा ठीक होतात मग त्या विलन मुलाला ते अक्सेप्ट करतात, तो पण घराचा एक सदस्य बनून जातो..मग सगळा कस ठीक होत…हम साथ साथ है..मग गणपती, करवा चौथ, गरबा, दिवाळी, होळी असे सण साजरे करतात की विचारू नका….मग एक दिवस अचानक कथेतील महत्त्वाच्या पात्रचा मृत्य होतो (शॉकिंग ना..:() मग त्याचे सगळे विधी दाखवा..सगळा भारत देशाला रडवा त्याच्या अकस्मीत निधनाने….त्याला जिवंत करा परत नाही तर तुमची कहाणी इथेच बंद पाडू, अशी धमकी मिळते डाइरेक्टरला..मग काय जनता बोली तो बोली…परत चेहरा बदलून त्या पात्राची एंट्री..(फ्लॅश बॅक असतो पण आता मला टाइप करायाच कंटाळा आलाय..तुम्ही काय ते समजून घ्या) सगळा कसा परत सुखात..हम साथ साथ है…मग कहाणी २० साल बाद अशी धक्का मारतात..पण त्यात नवीन पात्रच येतात फार फार तर आजोबाना स्वर्गवासी दाखवतात….पण आजी अजुन जिवंत आहे {वय मोजा वर १२० होत ना? त्यात टाका की अजुन २०;-)} मग परत भांडण, सण, मृत्यू, जन्म, हॉस्पिटल, पार्ट्या, काही महा एपिसोड चालू…..बस्सससस्स अजुन मला लिहण शक्य नाही 😉

भारतीय चॅनेल्स..गूगलबाबांकडून साभार
भारतीय चॅनेल्स..गूगलबाबांकडून साभार

वर जे वर्णन केला ते दोन सीरियल्सच (एक हिंदी एक मराठी), आता दोन दिवस ऑफीसमधून सिक लीव घेऊन घरी बसलोय आणि अश्या भयानक सीरियल्स बघितल्या की सांगू नका…कलर्स, झी टीवी, स्टार प्लस, ई टीवी, सहारा वन अश्या चॅनेल्सवर चालू असलेल्या मालिकांमधून  स्त्रियांवर होणारे अत्याचार नव्याने दिसू लागलेत मला (ही अतिशयोक्ती नाही, पण वास्तव जरी असला तरी मालिकांमधील त्यांची मांडणी मला आवडली नाही मला हेच सांगायाच आहे).

अश्या अनेक सीरियल्स आहेत मराठीच सांगतो ज्या कधीच विसरू शकत नाहीत प्रपंच. श्रियुत गंगाधर टिपरे, आभाळमाया (पहिल सत्र), दुनियादारी, ४०५ आनंदवन. बाकी मी टीवी फक्त न्यूज़, डिस्कवरी आणि स्पोर्ट्ससाठीच बघतो. तरी सुद्धा ना आना इस देश मे लाडो, चार दिवस सासुचे, ह्या गोजिरवण्या घरात, बालिका वधु, जहा मै घर घर खेली (ह्या सीरियल मध्ये म्हणे सोन्याच घर होत आणि तेच बेघर होतात कर्जापाई :D) अजुन नाव पण आठवत नाही..भापो ना? बस.. 🙂

ह्या सीरियल्स मध्ये काही स्पेशल, धक्कादायक होणार असेल तर त्याची वर्तमान पत्रात पहिल्या पानावर जाहिरातपण येते, यावरून तुम्ही त्यांची प्रसिद्धी ओळखू शकता. 🙂 पण सरते शेवटी विचार करतो आपण त्याला ईडियट बॉक्स म्हणतो पण त्याच्या समोर बसलेले आपण काय आहोत मग? आपण बघण सोडू तेव्हाच अश्या व्यर्थहीन सीरियल्स तेव्हाच बंद होतील, त्याना छान प्रतिसाद मिळतोय मग ते का बंद करतील?

तळटीपा

१. वर झालेला अती कॅंसाचा वापर फक्त हेरंबमुळे 😉

२. वाढदिवसाला अशी पोस्ट टाकणार नव्हतो, पण एक सीरियल बघितली आणि लिहायला घेतला.

३. तसा विषय पण नव्हता जे सुचला ते लिहल, त्यामुळे त्या एकाच सीरियलला दोष देऊ नका 🙂

शाळेला जातो मी…

आठवतो काय आजचा दिवस? काय म्हणता नाही? काय हे कसा विसरू शकता तुम्ही?

एक-दीड महिनामामाच्या गावी मस्त भेट देऊन, मज्जा करून शाळेच्या पुढल्या वर्गात जाणारे आपणच.. गावाला जाउन आला की आधी धावपळ शाळेच्या शॉपिंगची – पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट, पावसाळी बूट, गणवेश, नवीन डबा मज्जा ना एकदम…

पहिला दिवस शाळेचा - मायाजालावरुन साभार 🙂

जून महिन्याच्या १३ तारखेला सगळी छोटी मंडळी शाळेच्या गेटवर आपापली दप्तर सांभाळत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग घेऊन, काहीसे त्रासलेले (सुट्टी संपली म्हणून) काही आनंदी आपले मित्र भेटणार म्हणून, नवीन वर्गात जायला एकदम उत्साही, नवीन बाई सरांना भेटण्यासाठी उत्सुक आणि आयुष्याच्या पुढील पायरीवर चढून वाटचाल करायला एकदम तयार . खरच तो दिवस आजही आठवतो आदल्या दिवसापर्यंत चालेलेली तयारी, बाबांनी नवीन पुस्तकाना घालून दिलेली चापचोप कवर्स, आपण फक्त स्टिकर लावायचे 😉

वॉटरबॅगवर आपला कोणी तरी आवडीचा सूपरहीरो, किवा एकदम हाय फॅंडू गेजेट वाटावी अशी..दप्तराला जास्त खण हवेत आणि आपण ते कशासाठी वापरायचे ते आणल्याबरोबर ठरवायच..नवीन पुस्तकांचा वास घेत, वर्गात गोंधळ चालू होईल. आपण पहिल्या पानावर सुबक हस्ताक्षरात नाव लिहतो भले बाकी पुढली सगळी पान डॉक्टरी लिपीत 🙂 मग एक-एक तास संपायची घंटा वाजते, छोटी मधली सुट्टी, मोठी सुट्टी मग डबे खाउन बाहेर धुम ठोकायची..मग पकडापकडी, कॅच कॅच खेळायच..

घंटा वाजली की धावत धडपडत बाकावर येऊन बसायच, एकमेकांच्या खोड्या काढायाच्या परत अभ्यासात तात्पुरत मन लावून बसायच पण सगळा लक्ष असत ते शेवटचा तास संपायची घंटा कधी वाजतेय ह्याच्याकडे आणि एकदा ती वाजली की वाजली धुम घरी ठोकायची…मज्जा ना..

किती मस्त वाटत 🙂 निदान अश्या गोष्टींसाठी तरी कधीच मोठ होऊ नये..खरय ना मित्रहो?

–सुझे 🙂