पाउले चालती सह्याद्रीची वाट..

ह्या उन्हाळ्यात ऑफीसला जायचे वांधे होते तर मग बाहेर भ्रमंती तर विसरून जाच…पण आता किती बर वाटतय सांगू..पाउस येईल आता १० दिवसात. ईमेल्स धाडण चालू झाले, हे असा असा शेड्यूल आहे आताच सुट्टी टाकून ठेव नाही आलास तर बघ ह्या वेळी अश्या धमक्याही मिळायला सुरूवात झालीय..रस्ते शोधून ठेव, मॅपचे प्रिंट आउट काढून ठेव, ट्रेन एसटी चा वेळापत्रक बुकमार्क करून घे, नवीन सॅक, पाण्याची बाटली आणि थोडा ऑनलाइन रिसर्च…काय म्हणताय हे सगळ कशासाठी? अहो सगळीकडून ट्रेकचे वारे परत वाहायला सुरूवात झाली 🙂 सगळी मंडळी परत शिवाजीमहाराजांच्या ओढीने त्या काळातील सुदंर, प्रचंड गड, दुर्ग बघायला सरसावतील. सह्याद्रीच्या खडतर वाटा तुडवित, निसर्ग सौंदर्य न्याहळात, तो इतिहास आठवत, त्या इतिहासात रमायला काही क्षण घालवायला भेटी देतील..

मी तसा एकदम रेग्युलर ट्रेकर नाही, पण जेव्हा जेव्हा जायची संधी मिळते तेव्हा तेव्हा जमवायचा प्रयत्‍न तरी नक्कीच करतो..आता माझ्याह्या ट्रेक छंदाला दोन प्राणी कारणीभूत अनिश आणि प्रसन्न 🙂 इतिहासाचा भरपूर अभ्यास केलेले हे दोघे. ट्रेक म्हटला की तयार. मी जेवढे ट्रेक केले असतील त्यात हे दोघे होतेच (रायगड, पन्हाळा, पेठचा किल्ला, पेब फोर्ट, सारसगड, विसापूर, लोहगड, ढाक-बहिरी..) आजच खूप दिवसांनी आम्ही भेटलो. २००९ मध्ये कुठे जास्त जाताच आला नाही. मागच्यावर्षी ह्याच वेळी माझ्या जॉबचा प्रॉब्लेम होता, अनिश बंगलोरला गेला होता नोकरी निम्मित्त आणि प्रसन्नच्या वडिलांच्या प्रकृती थोडी बरी नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत कुठे जाण्याचा योग आलाच नाही.. ह्या १०-१५ दिवसात प्रसन्न आणि मी ठरवल्याप्रमाणे एक पाउस पडला रे पडला की एक किल्ला गाठायचा बस्स्स हे एकच धेय्य मनात ठेवून आहोत. आताच रोहनची पोस्टसुद्धा वाचली बलॉगर्स ट्रेकिंगबद्दल त्यासाठी मी तर एका पायावर तयार आहे. मागेच देवेन आणि माझा प्लानपण ठरला होता एक ट्रेक पावसात आणि त्या प्लानला बझ्झ बझ्झपुरीतले बहुतांश मंडळी तयार सुद्धा झाली आहेत…मज्जा

This slideshow requires JavaScript.

कस बर वाटताय सांगू, ह्या मुंबईच्या धकाधकीच्या, प्रोफेशनल लाइफ, फ्रस्ट्रेशन पासून दूर..इतिहासाच्या सानिध्यात, तो इतिहास जगत, घामाच्या आणि पावसाच्या पाण्याने भिजलेल्या अवस्थेत त्याकाळी ही जागा कशी असेल ह्याचा विचार आणि आकलन करत, ज्यानी हे किल्ले बांधले त्याना सल्यूट करत एक एक भाग बघून पिंजून काढायचा आहे. हे किल्ले म्हणजे उभे साक्षीदार आहेत त्या अभेध्य, असामान्य, अतुलनीय, पराक्रमी कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे. थोडक्यात सांगायचे हे एक एक गड तर माझी तीर्थक्षेत्रच, आता जसा वेळ मिळेल तसा पावसाची, उन्हाची तमा न बाळगता त्या सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये हा सुहास मुक्तपणे विहार करणार आहे पुढचे काही महिने आणि आता आपला ब्लॉग आहेच (जे खरडतो ते नियमीत वाचणारे पण आहेत :D) तो अनुभव तुमच्या समोर नक्की मांडेन..मी वेडा आहे किल्ले भ्रमंतीचा आणि तुम्हाला ते पटेल पण 🙂

||जय शिवाजी||

—————————————-

—————-

वो तो है अलबेला हजारों में अकेला…

आज बारावीचा निकाल, आयुष्याचा एका महत्वपूर्ण टप्पा ओलांडून एका नवीन प्रवाहात उड्या मारायला सज्ज असतील सगळे, कोणाला झोपच नसेल लागली, माझा हा पेपर खराब गेला, आता माझी वाट लागणार, मला ते गणित सुटलंच नाही, मराठीचा पेपर पूर्ण झालाच नाही 😦 ह्या ना त्या काळजीने. सारखं घड्याळ बघ, किती टक्के मिळतील मला? सीईटीमध्ये स्कोर येईल, पण बारावीत कमी स्कोर आला तर, गेलं माझं इंजिनियरिंग मुंबई बाहेर आणि मेडिकल महाराष्ट्राबाहेर…काय होणार माझ आज? मार्क कितीही पडू देत आई-बाबा आणि घरचे इतर लोक काय म्हणतील? त्यांची तर खूप अपेक्षा आहे माझ्याकडून, बाबांनी तर आधीच सांगून ठेवलं की, पोरीला मेडिकलमध्ये घालणार, आईला पोरला इंजिनियर बनवून फॉरेनला धाडायचंय..

किती किती ते प्रश्‍न, किती किती त्या अपेक्षा? मान्य आहे हे युग स्पर्धेच आहे..पण स्पर्धा करताना असं गाढव करायंच का आपल्या मुलांचे? त्याना थोडं समजून घ्यायला हवं, पण हे “काही पालक” समजून घेत नाही आणि मग फ्रस्ट्रेशन, भीती, स्वतःसाठी एक कमीपणाची भावना निर्माण होते आणि मग कदाचित त्यातूनच आत्महत्या करायला प्रवृत्त होतात..आपण कधी अशी बातमी पाहिली आहे का? “आज न्यू यॉर्कमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून मुलाची आत्महत्या” “ऑस्ट्रेलियात नापास झाल्यामुळे एका मुलीने गळफास लावून आयुष्य संपवले”..का आपल्याला अश्या बातम्या ऐकायला मिळत नाही तिथे? आणि प्लीज़ असा गैरसमज करू नका, की मी कोणी मोठा तत्ववादी आपल्याच शिक्षणसंस्थेवर आरोप करणारा.. ह्याच शिक्षणपद्धतीत मी माझे शिक्षण पूर्ण केलंय…झाली त्याला आता ६-७ वर्ष. म्हटले तर तसा जास्त काळ नाही लोटला, पण ह्या काळात वाढलेल्या स्पर्धेने मला तोंडात बोट घालायला भाग पाडलंय.

आमच्या इथे सुशांत म्हणून एक मुलगा राहतो यंदा बारावीच वर्ष, ह्या वर्षात त्याला मी फक्त दोन-तीनदा बघितला असेन..एकदा सोसायटीच्या पुजेला आणि एकदा मी त्याच्या घरी गेलेलो दसर्‍याला सोनं द्यायला…..पुजेला जेमतेम ३० मिनिटे थांबला असेल तो, त्याला अजुन थांबायच होतं, पण तोच नाही म्हणाला, कारण जितका वेळ तो खाली राहणार तितका वेळ त्याला जागरण करायला लागणार….म्हटलं जा बाबा तू घरी…हे एकच उदाहरण नाही. माझ्या मित्राचा भाऊ रोज रात्री १२ ला झोपून पहाटे ३-३:३० ला उठायचा, माझा मित्र त्याला ऑफीसमधून फोन करून अलार्म द्यायचा…म्हटलं झोपू दे रे त्याला एक दिवस नीट, तर बरोबर ४ ला त्याच्या बाबांचा फोन तुला भावाची काळजी नाही का? त्याने अभ्यास करून पुढे गेलेला नकोय का तुला? आता तो मित्र मलाच (मैत्रिपूर्ण)  🙂 शिव्या देऊ लागला फोननंतर…मित्राच्या भावाच बॅडलक,  तो परीक्षेच्या वेळात नेमका आजारी पडला आणि त्यानंतर त्याला खूप पडली सुद्धा 😦

आता तुम्ही पालक म्हणाल किती कष्ट घेतो मुलांसाठी आम्ही, मर मर झटतो, त्याना काही कमी पडू देऊ नये म्हणून पोटाला चिमटा काढत दिवस जगतो..मग त्यानी आमची ही अपेक्षा पूर्ण करू नये? मला मान्य आहे स्पर्धा युगात कोणालाच आपला मुलगा/मुलगी मागे नकोय, फक्त थोड त्यांच्या कलाने घ्या, ही एकच विनंती करतोय, आधीच विचारून ठेवा त्यांना कशात रस आहे..सगळे डॉक्टर, इंजिनियर होऊ शकत नाहीत आणि व्हायला पण नकोय. त्यांना त्याच्या भविष्याची वाटचाल करण्यात मदत करा, त्यांचा मार्गच बदलू नका प्लीज….ते चालतील त्या मार्गाने तुमच्या इच्छेखातर, पण दूरावतील तुमच्यापासून…

मी एवढा मोठा नाही की कोणाला सल्ले देईन..पण ही जीवघेणी स्पर्धा खूप कोवळ्या कळ्या कोमेजायला कारणीभूत ठरतेय उमलण्याआधीच त्यांना वाचवा…

दीए की बाती देखी, देखी ना उसकी ज्योती..सदा तुमने ऐब देखा, हूनर तो ना देखा… असं नको व्हायला  !!

सगळ्या माझ्या दोस्तांना ऑल द बेस्ट आजच्या निकालासाठी, तुम्हाला भरपूर यश मिळो आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळो….  🙂  🙂

– सुझे

अडोबी- शेवटचा दिवस

आज १५ मे २००९,  अडोबी (Adobe) सपोर्ट चा शेवटाच दिवस. ऑफीसमध्ये जाऊच नये अस वाटत होत, पण जाव लागणारच होत. बोरीवलीला पिकमध्ये १२ जण अडोबीचेच. सगळयांचे चेहरे पडले होते. मी पण गपचुप शेवटच्या सीटवर जाउन बसलो होतो. क्लाइंट ने इतका तडकाफडकी निर्णय घेतला होता की कोणाला सावरायला वेळच नाही मिळाला. रिसेशनमुळे आणि ओबामाच्या पॉलिसीमुळे अडोबीने मुंबई सपोर्ट कांट्रॅक्ट काढून घेतला.

१२ फेब्रुवारी २००७ ला अडोबी जॉइन केलं होत, नाइट शिफ्ट, रात्री उशिरा होणार जेवण, मग गाडीत डुलक्या काढत घरी पोचायच आणि झोपून जायच. मस्त शनिवार-रविवार सुट्टी. एक फिक्स शिफ्ट, क्लाइंट पण मस्त. पहिल्यांदाच मुंबईकडे त्यानी सपोर्ट आउटसोर्स्ड केला होता. लॉंच झाल तेव्हा पासून ह्या कंपनीशी एक नात जूळलं होत, पण जेव्हा ही गोष्ट एक महिन्यापुर्वी कळली होती की क्लाइंटने बॅक्कआउट केलंय प्रॉजेक्टवरुन, तेव्हा खूप राग आला होता. पण नंतर लक्षात आल, की बिडिंग प्रोसेसमध्ये आमच्या कंपनीने हाइ बीड प्लेस केली आणि त्याना जर आम्ही देत असलेला सपोर्ट कमी पैशात मिळत असेल तर का नाही घेणार ते?

सगळा विचारसत्र गाडीत गाणी ऐकत, तोंडावर एक प्लास्टिक स्माइल देत चालू होत. एव्हाना गाडी ऑफीसच्या गेट जवळ आली, मी उतरलो आणि सेक्यूरिटी गार्डला हाथ दाखवून आत शिरलो. फ्लोर वर आलो. माझ लॉगिन सगळ्यांच्या आधीच २ तास असायच. क्लाइंट रिक्वेस्ट होती. मी ६:३० ची शिफ्ट करायचो आणि बाकी सगळे ८:३० ला यायचे. त्यामुळे फ्लोर वर फक्त मी होतो माझ्या क्यू मधून. व्होईसची मंडळी कॉल्स घेत होती, मी बघत होतो कुठला एसॅकलेशन आलंय का ते. जास्त काम नव्हत, कारण अडोबीने सगळ्या केसेस आणि कॉल्स नोएडामधील  एका कंपनीकडे वळवलले होते. तरी थोड काम होत, ते करत होतो. जुने फोटो बघत होतो.

मन नव्हत, तरी कस्टमर्सचे प्रॉब्लेम अटेंड करत होतो. ८:३० वाजले सगळे आले, मग सगळ्याना एक एक करून रूम मध्ये बोलावून फाइनल इंटरव्यू सुरू केले, एफन्एफचे (फुल्ल अँड फाइनल). फ्लोरवर बाकी कोणीच काम करत नव्हते, मीच आपला कोपर्‍यात शेवटच्या पॉड वर कस्टमर्सना मदत करत होतो. सगळे मला म्हणाले छोड शॉन झी (Shaun Z.) बहोत काम किया, मरने दे वो कस्टमर्स आणि सगळे एकत्र जेवायला जाऊ म्हणून खाली उतरले. मी बसूनच होतो फ्लोरवर काम करत. आमचा टीम मॅनेजरपण म्हणाला जा रे काही खाउन ये, पण कसा सांगू आतून किती रडत होतो मी. मी एमोशोनली खूप गुंतून गेलो होतो सगळ्यात. ज्या मित्रांसोबत ईस्टरच्या मासला गेलो, ईद मध्ये काही दिवस रोजे ठेवले, गणपतीला मिळून पूजा आणि आरती केली. ज्यांच्यासाठी दिवाळीला माझ्या घरून एक-एक डबा बेसनचे लाडू, चिवडा, चकली असे घेऊन जायचो, मग सगळे हल्लाबोल करायचे त्यावर. सगळ सगळ कस आठवत होत. डेस्कच्या बाजूने केतकी गेली की उगाच तिची छेड काढ, मग तिची समजूत काढणे, मग तिला चॉकलेट देणे. सगळ्या फ्लोरवर कोणाला मदत लागली की दुरून ओरडायचे सुहास बिज़ी है क्या? देख ना ये इश्यू, दिमाग खराब कर रहा है यार ये कस्टमर.

सगळ सगळ त्या पॉडवर बसून आठवत होत. २ वाजले सगळे आपआपला नंबर, ईमेल आइडी देऊ लागले. माझ्याकडे शेवटचा कस्टमर आला, त्याचा प्रॉब्लेम लगेच रिसॉल्व केला, त्याने खुश होऊन अश्याच गप्पा सुरू केल्या..की बाबा “यू आर सो प्रोफेशनल्स इन दिस सपोर्ट, आइ लव्ड इट, होप टू सी यू अगेन म्हणून जाउ लागला, मीच त्याला समोरून म्हणालो नो सर दिस इंटरॅक्षन विल बी द लास्ट, दिस ईज़ माय लास्ट डे विथ अडोबी…तो म्हणाला व्हॉट? व्हेयर आर यू मूविंग?..मी काहीच नाही बोललो….”

मला खूप रडावसं वाटत होत त्याक्षणी. निघायची वेळ होत होती माझी. ३ वाजले होते. सगळ्यांना भेटायाचं होत मला जायच्या आधी. मग मायक्रोसॉफ्ट, सायबेस, एचपी मध्ये जाऊन, मग अडोबीच्या फ्लोरकडे वळलो. सगळ्याना गळाभेट देताना अश्रू थोपवत होतो मी. केतकी ने मला पिंग करून बाय म्हटलं, तस मी तिला भेटायला जाणार तेव्हा ती माझ्याकडे आली आणि हाथ मिळवून निघून गेली तिचे पाणावलेले डोळे बघून मलापण अचानक भरून आलं आणि मी वॉशरूम मध्ये गेलो. तोंडावर पाणी मारलं आणि बाहेर आलो. सगळे आज लॉग आउट नंतर थांबणार होते, मी पण हो सांगितलं होत, पण मला वाटत नव्हत मला ते शक्य होईल म्हणून मी नाही थांबणार सांगून सगळ्यांना भेटून निघालो. सगळे बघत राहीले माझ्याकडे मला काय झालं आणि मी आपला पाठ फिरवून डोळे पुसत बाहेर पडलो फ्लॉर वरुन…

त्या दिवशी ह्याच वेळी मी तो फ्लोर सोडून निघून आलो होतो. मी खूप ईमोशनल झालो होतो, कदाचित पहिला जॉब सुटायची, ईतकी नाती तुटायाची भीती म्हणा….शॉन त्या दिवशी खूप खूप रडला, पण ती नाती आजतागायत टिकून आहेत भक्कम.. 🙂

चला माझा शेवटचा ट्रान्सपोर्ट सुटतोय अडोबीचा ४ वाजले…..घाई करायला हवी….टाटा

 

(एक आठवण आजच्या दिवसाची, अशीच  )

– सुझे