रामनवमीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशीप आणि विवाहपूर्व शरीरसंबंध हा गुन्हा नसल्याच जाहीर केला.
तसा मी कोणी तत्त्ववेत्ता नाही, की कोणी मोठा माणूस की ज्याचे विचार कोणाला पटावेत कारण एक गंभीर विषयाला हात घालतोय. पण रोज जे काही बघतो आजूबाजूला, कानी पडत त्या वर मला आज शोक करण्यावाचून पर्याय नाही. म्हणजे तस सगळ्यांबद्दल माझ हे वाईट मत नाही, मी सुद्धा याच पिढीतला मी पण ३-४ वर्षापूर्वी कॉलेजमध्ये होतो, धम्माल केलीय. कॉलेजच्या नावाखाली भरपूर भटकलोय (१२वीत एकही लेक्चर अटेंड नाही केल्याचा रेकॉर्ड आहे साठेमध्ये अजुन)

आमच्या ग्रूप मध्ये तर आजही कुठली मुलगी माझ्या सोबत आउटिंगला पिकनिकला जात असेल तर तिच्या घरी फोन करून सांगतो आम्ही स्वत:, मग तिला तिच्या घरापर्यंत सोडून येतो. जरी कॉल सेंटर मध्ये काम करतो तरी मला माझी मर्यादा माहीत आहे, भले मग मला माझ्या पाठी कोणी काही म्हणू देत. वर घडलेला प्रसंग बघीतल्यावर लाज वाटली की अशी आहे पिढी आपली. थट्टा-मस्करी पुरता ठीक पण आजकल शाळेपासूनच हे प्रेम प्रकरण सुरू झालीत तीपण सीरीयस. त्यातून मग निर्माण होणार आकर्षण, संबंध काय बोलायच ह्यावर. आमच्या चारकोपच्या एका प्रसिद्ध शाळेतला प्रसंग इथल्या लोकाना माहीत असेलच नववीच्या मुला-मूलीना पोलिसानी धरून तसाच नागव शाळेत आणला होता ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून. हा एक खेळ झालाय खेळ, केवळ मज्जा मारायला हा/ही माझा बाय्फ्रेंड/गर्लफ्रेंड…लिव्ह इन रीलेशन म्हणतात ती मूल ह्या वयात याला. आमची परवानगी होती मग कोणाचा बाप अडवेल आम्हाला ह्या गुर्मित ही पिढी वाहत जातेय. थोडे दिवस राहू एकत्र एकमेकना साथ देऊ आणि नसेल पटत तर निघून जाउ. अशी काही उदाहरण समोर आली की वाटत नको तो कायदा. काय मिळणार आहे त्याने? लावून द्या पोराची-पोरीची लग्न एकदा अंगवळणी पडला की घेतील सांभाळून. ह्या निकालाच जेवढा स्वागत झाला तितकीच टीका ही झाली…मग परत वाद-विवाद, चर्चा. समलिंगी कायदा (सेक्षन ३७७) झाला त्यावेळी ही अशी बोम्ब झाली होती.
पण माझ मत इथे थोड्यासाठी बदलतय कायद्याच्या बाजूने म्हणा, कारण की मी माझ्या आयुष्यात अशी दोन-तीन उदाहरण बघतोय की जी काही गरजेपोटी अशी कांट्रॅक्ट मॅरेज करून रहातात, लिव्ह इन रीलेशनशिप सोप्प्या शब्दात..स्वताचा फायदा बघितला त्यात कारण दोघांचीही वय झाली होती आणि घराचे हफ्ते भरण्यासाठी त्या मुलीने हा पर्याय स्वीकारला. मुलालाही आर्थिक मदत हवी होती, त्यामुळे दोघांच्या नोकरीवर त्यानी कर्ज काढल. माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती..तिला समाजवला पण होत पण…असो तिची गरज होती आणि तिने हे केला आपल्या घरच्या फायद्यासाठी त्यामुळे मला तीच वर्तन अजिबात गैर वाटत नाही. आज तीन वर्षानंतर त्यानी लग्न केल.
मी कोणाही एका बाजूने बोलत नाही आहे. दोन्ही बाजू पटतात असा म्हणा हवा तर..त्यामुळे माझा स्वताचा वैचारिक गोंधळ सुरू आहे 😦 नाती जपायला हवीत मित्रानो मग ती लग्न करून जपा किवा लिव्ह इन मध्ये राहून..ह्या कायद्याची पळवाट होऊ देऊ नका म्हणजे मिळवली…
लिव्ह इन रिलेशनशीप विषयावर वाचलेला हा लेख बघा वाचून आवडेल – लिव्ह इन रिलेशनशीप : कऱहा ते मिसिसीपी
असा सुवर्णमध्य काढण जमेल का खरच? असे कायदे का करावे लागतात याचा विचार केलाय का कोणी? सांगा ना?