मराठी जनतेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला (?)

“मराठी जनतेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला” – माननीय हिन्दुह्रुदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे.

सामना मधील संपादकीय मधून मांडलेला कालचा अग्रलेख वरील शीर्षकाखाली प्रकाशित झाला. हे वाचून हसू की रडू असा झाला. शिवसेनेचा दारुण पराभव झाला निवडणुकीत. असा पराभव गेल्या २० वर्षात कधी झाला नसेल. त्याच चिंतन करायचे सोडून म.न.से. लाच आपल्या पराभवाचा कारण सांगत आपला पराभव हा मराठी माणसाचा आहे असा सांगत आहेत. काय म्हणायचा याला? बाळासाहेब सारखा एक मातब्बर राजकारणी नेते असा आरोप (?) कसे करू शकतात. उद्धवने ह्या निवडणुकीत चांगला प्रचार केला होता अगदी अनपेक्षित, पण कुठे तरी शिवसैनिक, सामान्य मतदार, आणि शिवसेनेचे नेते मंडळी ह्यात एक दरी निर्माण झाली. आणि ती दरी ते भरून काढण्यात ते अपयशी झाले. निवडणुकी साठी चिक्कार विषय आरोप होते त्याना सरकारवर करायला, पण ऐन निवडणुकीत त्यांच बोट फक्ता राजकडेच..बस. राज फॅक्टर हा महत्वाचा होता आणि आता राहिलाच हे शिवसेनेने लक्षात ठेवायला हवा.

युती सरकारने आता राज ठाकरे पेक्षा सरकारवर लक्षा केंद्रित केलेला बर. त्याना सलग तिसर्यांदा विरोधीपक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. भाजप ने तर दोन जागा जास्त निवडून आणल्या शिवसेने पेक्षा ही अधिक लाजीर्वाणी गोष्टा झाली. आधी मराठी, मग हिंदुत्व , मग परत मराठी (राज मुळे) असे मुद्दे बदलत राहून शिवसेनेत एक प्रकारचा गोंधळ झालाय. शिवेसेना हा मराठी माणसाचाच पक्ष आहे पण त्याना थोडा काळानुसार राजकारण करावा लागेल. बाळासाहेब हे मराठी जनतेचे नेहमीच आदर्श राहतील, पण आता नवीन पिढी तेच बाळासाहेब राज ठाकरे मध्ये शोधू लागले आहेत. उद्धव ह्यांच काम खूप चांगला होताय दिवसेंदिवस, पण त्याना थोडी आक्रमकता आणायला हवी. राज ह्यानी तीन वर्षात जो करिश्मा करून दाखवाला त्याला तोड नाही. शिवसेनेला आता अधिक आक्रमक व्हाव लागेल, कारण राज हे तरुण पिढीचे बाळासाहेब झालेत आणि शिवसेनेच्या मूळ मुद्द्या वर म.न.से. प्रभावी आक्रमण केलय. कॉंग्रेस ला एक हाती सत्ता मिळाली आणि पुढची ५ वर्ष सोनियाच्या पायाशी हे राजकारण पायघड्या पाडणार… आता वेळ चिंतनची सगळ्यांसाठीच.

Raj = Balasaheb

!! शुभ दीपावली !!

Faral..Yummmy

दसरा झाला की पाठोपाठ

हजेरी लावते ही दिवाळी

आनंदाची मुक्तहस्तपणे

उधळण करते ही दिवाळी

आप्तजणांच्या गाठीभेटी

घडवून आणते ही दिवाळी

सुंदर सुंदर आकाशदिव्यानी

प्रकाशमय करते ही दिवाळी

लहानांसाठी मजाच मजा

घेऊन येते ही दिवाळी

खमंग फराळाचा आस्वाद

घ्यायला देते ही दिवाळी

भेटवस्तू आणि भेटकार्डांची

देवाणघेवाण घडवते ही दिवाळी

अशी सर्वांचा आनंद

द्विगुणीत करते ही दिवाळी

तेव्हा माझ्याकडून सुद्धा

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा….!!

विधानसभा प्रिमियर लीग

आज १३ ओक्टॉबर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणूकीचा दिवस. सगळे राजकारणी देव पाण्यात सोडून मतदार राजाचा कौल आपल्या बाजूने लागावा अशी प्रार्थना करत आहेत. तशी म्हणावी तर ही निवडणूक आपल्या सारख्या मतदारला एक संधी मिळाली आहे ५ वर्षानंतर. त्या संधीचा सगळ्यानी लाभ घ्यावा आणि आपल्या विभागातील योग्य उमेदवारला निवडून द्यावे ही विनंती.

मी आतच मतदान करून आलो.मी राहतो त्या चारकोप मतदार संघात शिवसेनेच वर्चस्व होत, पण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खूप मोठा आव्हान सेना-भा.ज.प समोर उभे केलाय मागच्या निवडणुकीत. त्यामुळे यंदा काहीच भाकित करता येणार नाहीत. बघुया काय होताय ते. जर आज संधी मिळून पण काही झाला नाही तर ५ वर्ष बघतच बसायचाय आपल्या सगळ्याना..पण सगळ्या मतदरांकडुन एकच छोटी अपेक्षा आहे, की तुमच्या दृष्टीने योग्य अश्या उमेदवारालाच निवडून द्या. एमोशनल होऊन किवा मी आज पर्यंत यांनाच मत दिलय म्हणून परत त्यानाच असा विचार करू नका. एखादा ब्रँड जर नाव मोठा लक्षण खोटा म्हणून निघाला तर आपण चेंज करतो ना? मग उमेदवार का नाही निवडत त्याची लोकोपयोगी काम बघुनच?

आता शेवटचे दोन तास मतदानचे. मग दिवाळी आणि मग निकालानंतर जिंकलेला पक्ष दिवाळी साजरी करेल, विरोधी पक्ष मतदान कमी झाल म्हणतील आणि निवडणुकीचे आत्म्:चिंतन करत बसतील. परत ये रे माझ्या मागल्या. जर ते तसा नाही झाला तर उत्तमच पण ते जरा स्वपनवतच दिसतय.

आता निकालाची (फाइनल ची) वाट बघा जर चांगला आलाच तर छान नाही लागला तर काय ५ वर्ष वाट बघा की..अजुन काय?